दीड कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भरले पिक विमा अर्ज । पहा तुमच्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांनी लाभ घेतला



नमस्कार शेतकरी मित्रांनो,

आज आपण एक रुपयांमध्ये पिक विमा या महाराष्ट्र शासनाच्या योजनेबद्दल अधिक माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांना शेती करत असताना अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते.त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणीचा डोंगर उभा राहतो. याचा विचार करून महाराष्ट्र सरकारने एक रुपयात पिक विमा योजना सुरू केली आहे. 

या योजनेमध्ये शेतकऱ्याला एक रुपया भरून पिक विमा घ्यायचा आहे. तर वरची रक्कम महाराष्ट्र शासन स्वतः शेतकऱ्यांसाठी भरणार आहे. ही योजना सुरू झाल्यापासून आज अखेर जवळपास दीड कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी ला घेतला आहे, अशी माहिती राज्याची कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी विधानसभेत दिलेली आहे.

Whatsapp Group Join Now
Facebook Group Join Now


शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद शेतकरी बांधवांनी या हंगामामध्ये एक रुपया पीक विमा योजनेला चांगलाच प्रतिसाद दिली असल्याचे दिसून येत आहे दरम्यान पिक विमा भरण्याची अंतिम तारीख ही ३१ जुलै ची होती.

मात्र काही शेतकऱ्यांनी ३१ जुलै पर्यंत विमा भरले नव्हते, याचाच विचार करून राज्य सरकारने पिक विमा भरण्याची तारीख मध्ये वाढ करून दिली आहे. आता शेतकरी मित्र आपला विमा ३ ऑगस्टपर्यंत भरू शकतील अशी माहिती देखील कृषिमंत्र्यांनी दिली आहे.



पिक विमा भरण्यासाठी सध्या शेतीचा हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांना वेळ मिळत नाही तसेच नेहमीप्रमाणे विमा वेबसाईट सतत डाऊन होत असल्यामुळे शेतकरी मित्रांना पिक विमा भरण्यात अडचण येत आहे. तर काही शेतकरी शेतातील कामे सोडून दिवसभर सीएससी केंद्रावर चकरा मारताना दिसत होते.

काही शेतकरी ३१ जुलै २०२३ ही शेवटची तारीख असल्यामुळे चिंताग्रस्त आवश्यक दिसत होते याच गोष्टीकडे लक्ष देऊन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पिक विमा भरण्यासाठी वेबसाईट सोळी सुरू करून विमा भरण्याची तारीख आता ३ ऑगस्ट २०२३ केलेली आहे.

आता पाहूया कोणत्या जिल्ह्यात किती विमा भरले आहेत.

नागपूर - १२ लाख
नाशिक - ११ लाख
लातूर - ३९ लाख
पुणे - १६ लाख
कोल्हापूर - ४७ हजार
कोकण - १ लाख ८० हजार
छत्रपती संभाजी नगर -  ३८ लाख
अमरावती - ३ लाख

वरील आकडा जरी आपणास मोठा दिसत असला तरी महाराष्ट्रातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी अजून या योजनेचा लाभ घेण्यासाठी विमा योजनेत भाग घेतला दिसत नाही तरी आम्ही सर्वांना विनंती करतो हा एक महाराष्ट्र शासनाचा चांगला असा उपक्रम आहे तरी सर्वांनी एक रुपयांमध्ये विमा भरून आपल्या शेत पिकाचे संरक्षण करावे.













Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url