मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू जाणून घ्या अर्ज कसे करावेत
सौर कृषी पंप योजना, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्याअर्ज कसे करावेत.
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नेहमीच नवीन नवीन योजना राबवत असते, अशातच महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेचा शुभारंभ केलेल्या आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी मित्रांना दिवसा मोफत वीज उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश ठेवण्यात आलेला आहे.
आजच्या ब्लॉगमध्ये आपण या योजनेबद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत. जसे या योजनेचे काय फायदे आहेत, ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया काय आहे. हे सर्व आज आपण पाहणार आहोत.
ह्या योजनेची उद्दिष्टे काय आहेत.
- शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज पुरवठा करणे.
- शेतकऱ्यांचा लाईट बिलाचा खर्च कमी करून आर्थिक त्रास कमी करणे.
- नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे.
- अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे.
- डिझेल पंपाच्या तुलनेत शून्य परिचलन खर्च.
या योजनेची अंमलबजावणी पूर्वी महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास प्राधिकरणामार्फत केली जात होती मात्र आत्ता ती योजना महावितरण कडे सोपवण्यात आली आहे आता महावितरण या योजनेच्या अंमलबजावणी करणार आहे.
लाभार्थी निवडी चे निकष काय असणार आहेत.
- अतिदुर्गम भागातील शेतकरी.
- सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध असावा. मात्र अशा शेतकऱ्याकडे पारंपारिक पध्दतीने विद्युत जोडणी झालेली नसावी.
- 5 एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमतेपर्यंत सौर कृषीपंप व 5 एकरापर्यंत जास्त शेतजमीन धारकास शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देण्यात येईल.
- राज्यातील पारंपारिक ऊर्जेद्वारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी.
- विद्युतीकरणासाठी वन विभागाची ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी
- महावितरण कंपनीकडे विद्युत जोडणीसाठी पैसै भरुन ही प्रलंबित असणाऱ्या ग्राहकांपैकी / शेतकऱ्यांपैकी ज्यांना नजीकच्या काळात विद्युत जोडणी मिळणे शक्य नाही असे शेतकरी.
- महाराष्ट्र शासनाच्या सिंचन योजनेअंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.
- वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, नदी / विहिर / बोअरवेल यांचे शेजारील शेतजमीनधारक शेतकरी या योजनेत पात्र राहतील.
- सदर योजनेअंतर्गत सौर कृषीपंपासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून 10 टक्के व अनुसूचित जातीच्या / अनुसूचित ़जमातीच्या लाभार्थ्यांकरिता 5 टक्के लाभार्थी हिस्सा म्हणून लाभार्थ्यास भरणे आवश्यक आहे.
- अटल सोलर योजनेमध्ये अर्जदाराने आधी लाभ घेतलेला नसावा.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कशा प्रकारे करावा.
- शेतकरी मित्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी पूर्णपणे ऑनलाईन प्रक्रियेने अर्ज करावा.
- आवश्यक कागदपत्रे जमिनीची कागदपत्रे जसे की जमिनीचा सातबारा उतारा, आधार कार्ड बँक, पासबुक ही आवश्यक कागदपत्रे आपण तयार करावे.
- तांत्रिक पूर्तता , MSEB चे अधिकारी आपल्या शेतात येऊन जागेची पाहणी करू शकता त्यानुसारच तांत्रिक अडचणी सोडवून मगच आपल्या शेतामध्ये कृषी पंप लावला जाईल.
सौर कृषीपंप नविन वीज जोडणी करिता अर्जाची प्रक्रिया काय असेल.
- महावितरणाच्या वेब पोर्टलवर (https://www.mahadiscom.in/solar) ऑनलाइन अर्ज करावा.
- सध्याच्या कृषीपंपाकरिता नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा करुन प्रलंबित असलेल्या अर्जदाराने फक्त काही अनिवार्य फील्ड, उदा. अर्ज क्रमांक, पैसे भरल्याची पावती क्रमांक, मंजुरी क्रमांक आणि क्षमतेची मागणी इ. तपशील देणे अनिवार्य आहे.
- नवीन अर्जदार (परंपरागत कृषीपंप नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा केलेला नाही) सर्व फील्ड अनिवार्य आहेत म्हणून तपशील भरणे आवश्यक आहे.
- ए - 1 फॉर्मवर संपूर्ण माहिती भरावीे सोबत (कागदपत्रांची प्रत अपलोड करावी)
- 7/12 उतारा प्रत
- आधार कार्ड
- कास्ट प्रमाणपत्र (एससी / एसटी लाभार्थींसाठी)
- अर्जदाराने ए - 1 फॉर्मवर व घोषणापत्रावर सही करणे आवश्यक आहे.
- ऑनलाइन ए - 1 फॉर्म प्राप्त झाल्यापासून 10 दिवसांच्या आत, सर्वेक्षण केल्यानंतर फील्ड ऑफिसमधून डिमांड नोट जारी केले जाईल. जर काही विसंगती आढळली तर त्यानुसार अर्जदाराला कळविण्यात येईल.
- डिमांड नोट देय झाल्यानंतर लाभार्थी एजन्सीचे नाव सादर करेल / देईल (केवळ 25000 निविदासाठी लागू आहे).
- प्रत्येक टप्प्यावर अर्जदारांना एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.
Apply Online : Click_here
